LOKSANDESH NEWS
पुसद येथे शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन
महागाव तालुक्यात चिलगव्हाण या गावातील शेतकरी सरपंच साहेबराव करपे पाटील या शेतकऱ्याने आपल्या पत्नी व चार अपत्याला घेऊन वर्धा जिल्ह्यातील पवनार दत्तपुर येथे सामूहिक आत्महत्या केली होती.
शहीद शेतकरी साहेबराव करपे पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शेतकरी आत्महत्येचे स्मरण व सर्जक म्हणून त्यांनी केलेला त्याग, बलिदान व्यर्थ न जाओ या करीता स्मृती प्रित्यर्थ सामूहिक श्रद्धांजली देण्यासाठी पुसद येथे अहिंसात्मक मार्गाने एक दिवसीय उपवास ठेवून अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
अन्नत्याग आत्मकलेश आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली