चिखलीत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी पुत्रांचे आंदोलन
राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी सहवेदना दिनानिमित्त चिखलीतील शेतकरी पुत्रांनी एक दिवसाचा उपवास करून आंदोलन केले. राज्यभर 19 मार्च रोजी शेतकरी सहवेदना दिवस पाळला जातो. या निमित्ताने चिखलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन पक्षविरहित आणि सामाजिक स्वरूपाचे होते. विविध पक्षांतील शेतकरी पुत्रांनी यात सहभाग घेतला होता. या आंदोलनादरम्यान उपस्थितांनी शेतकऱ्यांच्या समस्या, आत्महत्या आणि कृषी धोरणांबाबत आपले विचार मांडले. भविष्यात संयुक्त लढ्याचे नियोजन करण्यासाठी बैठक घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली