sangli | 27/2/2025
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून 9 मार्च रोजी ईशान्य मुंबई मधील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातून होणारे आउटगोइंग रोखण्यासाठी महाराष्ट्रात असे विभाग वार मेळावे घेतले जाणार आहेत. संजय राऊत यांनी आज मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात जाऊन पाहणी केली
- आम्ही जेव्हा पक्षाचं काम सुरू केलं, आमच्या काळात तेव्हा शिवसेनेची विभाग शिबिर आम्ही नेहमी घेतो. आम्ही शाखांचे वर्धापन दिन आमच्या काळात साजरे होत होते आणि त्या वर्धापन दिनाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे देखील शाखेत येत असत. आम्हाला त्या पद्धतीने नव्याने काम करणे गरजेचे आहे, असे लक्षात आले
- पराभव होत असतात, लोकसभेला जिंकलो, विधानसभेला आम्ही जिंकू शकलो नाही. पण शिवसेनेचा उत्साह आणि जिद्द कायम आहे
- ज्या प्रकारचं राजकारण आणि दबावाचा राजकारण सुरू आहे प्रशासन मध्ये जे भाई निर्माण झाले आहे, ईव्हीएम मुळे हरलो, पैशामुळे हरलो असेल पण त्यांना आम्हाला एक प्रोत्साहन देणे गरजेचे आहे
- यासाठी राज्यभरामध्ये विभागीय शिबीर करण्याची योजना आहे
- ईशान्य मुंबईची सुरुवात मुंबई आधी होत आहे, त्या दिवशी दिवसभर कार्यक्रम असेल
- उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख येणार आहेत. उद्घाटनाला सकाळी आदित्य ठाकरे असतील आणि शिवसेनेचे सर्व नेते शिवसैनिकांना फक्त मार्गदर्शन आणि भाषण करणार नाही आणि या भागात शिवसेनेला एक ठोस कार्यक्रम घेऊन जातील
- आम्ही आता बाहेर पडलेलो आहे. शिवसेना आता बाहेर पडलेली आहे. संपूर्ण राज्यातला नेमणुकांची काम पूर्ण होतील - शिवसेनेचे सर्व नेते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात फिरतील
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.